सातारा- गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अद्याप देखील याठिकाणी महापुराची स्थिती कायमच आहे. याठिकाणी अनेक गावांना पुराचा वेढा बसलेला आहे.
दरम्यान, शहरात आज सकाळ पासून पुरग्रस्त आणि पुरात अडकलेल्या नागरिकांना सातारा शहरातील सर्व मशीद मधील मुस्लिम बांधवांनी जेवणाचे पार्सल तयार करून वाटप केले आहे. या बांधवांनी स्वयंपाक बनविण्यापासून तर वितरण करण्याची जवाब दारी घेतली होती.