पुणे – हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी” ही ज्ञानदेवांच्या हरिपाठातील ओळ संपूर्ण वारकरी संप्रदायाचा सारच जणू आपल्यापुढे उघडून ठेवते. ही ओळ आपल्या मानत ठवून प्रत्येक जण आपापल्या परिने अन्नदान करत असतो. म्हणूनच भाविकांची भूक शमविण्यासाठी एक अनोखी शक्कल नांदेड जिल्ह्याच्या दिंडीत लढविण्यात आली आहे. या युक्तीची चर्चा आता सगळीकडेच रंगू लागली आहे.
नांदेड जिल्ह्यातील दिंडीत केवळ दोन महिला पाचशे वारकऱ्यांसाठी चपात्या करतात. या चपात्यांना कमीत-कमी वेळ लागावा म्हणून ही शक्कल लढवली आहे. वारीतील त्यांची एक चपाती एवढी मोठी असते कि एक काय दोन माणसेही खाऊ शकणार नाही. या युक्तीबद्दल प्रभातच्या प्रतिनिधींनी दिंडी मालकांकडून जाणून घेतले आहे.