नवी दिल्ली – निवडणूकीच्या आधी ‘आमचं ठरलंय…’ असे सांगणारे भाजपा आणि शिवसेनेचे मात्र निवडणूक निकालानंतर चांगलेच बिनसले आहे. लोकसभा निवडणूकीदरम्यान ठरल्यानुसार सत्तेमध्ये ५०-५० फॉर्म्युल्यावर ठाम राहत शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला आहे. तर असा कोणताही शब्द दिला नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला खोटं ठरवलं आहे. त्यामुळे विधानसभेचा निकाल लागून एक आठवडा उलटला तरी शिवसेनेचा नूर बघून भाजपने सत्तास्थापनेसाठी अजूनही कोणताही प्रस्ताव न पाठवल्याने कोंडी कायम आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी सत्तास्थापनेवरून भाजप शिवसेनवर खोचक टीका केली आहे.
A Owaisi:What is this 50-50,is this a new biscuit?How much 50-50 will you do?Save something for Maharashtra’s public.They (BJP&Shiv Sena) are not bothered about the destruction rain has caused in Satara. All they talk about is 50-50.What kind of ‘Sabka Sath Sabka Vikas’ is this? pic.twitter.com/Ct4DFRLnDp
— ANI (@ANI) November 3, 2019
ओवेसी यांनी युतीवर खोचक टीका करत प्रश्न विचारला आहे की,’“हे 50-50 काय आहे? काय एखादं नवं बिस्किट आहे का? किती 50-50 करणार ? काहीतरी महाराष्ट्राच्या जनतेसाठीही ठेवा. त्यांना साताऱ्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची चिंता नाहीये, ते सगळे 50-50 च्या बाता मारतायेत. हा कोणत्याप्रकारचा ‘सबका साथ सबका विकास’ आहे असा सवालही ओवेसी यांनी विचारलाय.’