नागरिकत्व कायदा यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भातील आरोप-प्रत्यारोपासंदर्भात भाजपची भूमिका काय? अशी विचारणा केली.
त्यांच्या देशात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असतील तर गाठ हिंदुस्थानशी आहे, असे ठणकावून सांगायला हवे होते. सावरकरांबाबत शिवसेनेची काल जी भूमिका होती तीच आजही आहे आणि उद्याही राहिल. तुम्ही जर सावरकरांना मानता तर सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत देश एक रहावा, असे त्यांचे विचार होते.
देश भाजप एकत्र करणार का? पीडितांना तुम्ही इथे बोलवत आहात. संपूर्ण देशात अस्वस्थता आहे. भलेही त्यात हिंदू असतील तरी याचा अर्थ तुम्ही सावरकरांच्या विचारांचा द्रोह करत आहात असाच होतो.
सावरकरांना भारतरत्न मिळावा, अशी मागणी शिवसेनेकडून यापूर्वी करण्यात आली होती. ती मागणी तुम्ही पुन्हा करणार आहात का? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, आम्ही जी मागणी केली होती तो त्यांचा अधिकार आहे.