मुंबई – राज्यातील करोनामुळे बंद ठेवण्यात आलेली मंदिरे पुन्हा उघडली जावीत, अशी सुचना करणारे एक पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. तथापि त्या पत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून काही आक्षेपार्ह प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना सडेतोड उत्तर पाठवले आहे. माझ्या हिंदुत्वाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे. आता यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
अमृता फडणवीस यांना बोलायचे असेल तर…; सेनेच्या महिला नेत्याने दिले थेट आव्हान
आरे मधलं कारशेड कांजूरमार्ग ला हलवणे म्हणजे बाल हट्ट पुरवण्याचा प्रकार आहे असे आ. प्रसाद लाड म्हणाले असं मी ऐकलंय..
मग प्रश्न असा आहे की, मागील सरकारच्या काळात पोलिसांची सरकारी बँकेतील खाती खाजगी ॲक्सिस बँके मध्ये वळवली त्याला कोणता हट्ट म्हणायचा ??@PrasadLadInd— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) October 13, 2020
अमृता फडणवीस म्हणाल्या कि, वाह प्रशासन! बार आणि दारूची दुकाने सुरू आहेत. मग मंदिरे डेंजर झोनमध्ये आहेत का? नियमावली लागू करण्यात काही जण असमर्थ ठरतात, त्यांना त्यावेळी प्रमाणपत्राची आवश्यकता असते, असे म्हणत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले.
अमृता फडणवीस यांची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका; म्हणाल्या…
तर भाजप नेते “आरेमधील कारशेड कांजूरमार्गला हलवणं म्हणजे बाल हट्ट पुरवण्याचा प्रकार आहे,” असं म्हणत भाजपा नेते प्रसाद लाड यांनी अप्रत्यक्षरीत्या आदित्य ठाकरेंवर टीका केली होती.
दरम्यान, मेट्रो कारशेड स्थलांतरित करण्याच्या निर्णयावरून भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला यावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पोलिसांची बँक खाती ॲक्सिस बँकेत वळवल्याचा हवाला देत भाजप नेत्यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी
“आ. प्रसाद लाड म्हणाले, आरेमधील कारशेड कांजूरमार्गला हलवणे म्हणजे बाल हट्ट पुरवण्याचा प्रकार आहे, असं मी ऐकलंय.. मग प्रश्न असा आहे की, मागील सरकारच्या काळात पोलिसांची सरकारी बँकेतील खाती खाजगी ॲक्सिस बँकेमध्ये वळवली त्याला कोणता हट्ट म्हणायचा??,” असं म्हणत अप्रत्यक्षरीत्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावरही निशाणा साधत उत्तर दिलं आहे.