घरात, गॅलरीत थाळी वाजवायला सांगितली की, काढ मिरवणूक अन् वाजव बॅंडबाजा…कर नागीण डान्स..
पणती लावायला सांगितली, तर लाव टेंभा..
अरे हे लावलय काय..
आपली लायकी तीच, असं वाटू लागलंय आता..
तासभर नाही भाजीला सोडल, तर जस काय जत्रेत फिरतोय..
आपल्याला हे सुध्दा उत्सवाचे दिवस वाटू लागलेत..
इंग्रज गेले सोडून.. त्यालाही आता अनेक वर्षे झाली.
पण निदान अनुकरण करायचं तर नीट ना..
त्या गोऱ्यांनी आपल्या सौंदर्य दृष्टीने अनेक सुंदरस्थळे निर्माण केली स्व:ताच्या आनंदासाठी.. निसर्गाचा आनंद भरभरून घेण्यासाठी..
त्यांनी त्या महाबळेश्वरला “सन’सेट पॉईंट निर्माण केला.
खुर्च्या मांडून कुटुंबीयांसह सुर्यास्ताचा आनंद त्याच नजरेने शांतपणे घेणारे इंग्रज गेले..
पण आपण, त्याच “सन’सेटवर जाऊन सुर्य जसा जसा बुडायला लागेल तसे शिट्ट्या, टाळ्या, आरडा ओरडा, डोली बाजा, गर्दी, चेंगरा चेंगरी..
असा सारा धिंगाणा करून परत सांगायला मोकळे…
काय सुर्य दिसत होता राव…
हेच आपल्या अंगलट येऊ राहिलय आता..
अरे, हा काय दंगलीचा कर्फ्यु आहे की जाळपोळीचा ?..
थोडी सूट मिळाली की, झाला उत्सव सुरू..
काय गर्दी, कसल आलय सोशल डिस्टन्स…
युरोपियन देशातले अत्याधुनिक सुविधा असणारे जगातील वरच्या क्रमांकाचे देश सैरभैर झालेत..
इटलीचे पंतप्रधान हतबल झालेत..
इंग्लंडचे पंतप्रधान बेरीस जॉन्सन आयसीयुत आहेत…
शेकडोंनी माणसे रोज मरत आहेत.
प्रचंड सुविधा असूनही त्यांची ही अवस्था..
मग दादांनो आपल काय होईल..
रांग लागली ना, तर हॉस्पिटलमधे व्हेंटीलायझर सोडा खाट देखील भेटणार नाही.
आपण नेहमी म्हणत असतो, रडायला माणूस नव्हता…
हेच अनुभवावं लागेल आपल्याला.. पर्यायच नसेल…
ते पोलिस तुमच्या जीवासाठी रस्त्यावर आलेत,
त्यांना नाही का संसार.. निदान ते भान तरी ठेवा..
जग खूप सुंदर आहे, खूप जगायचं आहे आपल्याला..
मरण इतकेही स्वस्त करू नका..
थोड भान ठेवा, वाईट काळ आहे,
सरकार आपल्यासाठी सर्वतोपरी मदत करतेच आहे.
एव्हढच करा, नीट गप घरात बसा… इतकंच
– जयंत येलुलकर
प्रमुख कार्यवाह, मसाप, सावेडी उपनगर
मो : 9822096961