खाकी वर्दी मागे दडलय काय….चित्रपटांच्या माध्यमातून एक डायलॉग अनेकदा लोकांसमोर आला. “अगर पुलिस चाहे, तो मंदिर के बाहर की चप्पल भी कोई चोरी नही कर सकता’. चित्रपटात बहुतेक वेळा पोलिसांची भूमिका निगेटिव्ह दाखविण्यात आली. 21 मार्चपासून देशात लॉकडाऊन आहे. सगळे घरातच बसले आहेत. काही जण लॉकडाऊनचा नियम तोडताना दिसत आहेत.
आपली खाकी त्याच दिवसापासून रस्त्यावर उतरली. देशाच्या सीमेवर जसे लष्करी जवान रक्षण करतात. त्याचप्रमाणे लोकांनी घरातून बाहेर पडू नये, यासाठी शहरात ही खाकी दक्ष आहे. चारपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, सोशल डिस्टंसिंग पाळावे, त्याचबरोबर लोकांना मूलभूत गरजा भागतात का? यातही खाकीने जातीने लक्ष घातले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील, उप अधीक्षक संदीप मिटके यांच्यातील सोशल पोलिसिंग देखील यानिमित्ताने समोर आले.
पोलिस दल ज्या पद्धतीने सामाजिक कार्य करीत आहे, त्याला केवळ सोशल पोलिसींग, अशीच उपाधी सार्थ ठरेल. रस्त्यावर मोकाट फिरणांवर कारवाई करतानाच खाण्यापिण्याची भ्रांत असलेल्यांची व्यवस्थाही पोलिसांनी केली, हे कौतुकास्पद आणि अभिमानास्पद देखील.बंदोबस्तासह रेशन पोचविणे, फवारणीत सहकार्य करणारे पोलिस दल देखील नगरकरांनी पाहिले. मात्र, दुर्देवाने अजुनही काही महाभाग सोशल डिस्टन्स पाळण्यात कमी पडताना दिसतात. करोनाच्या विषाणूची कोठूनही लागत होऊ शकते. मात्र, कुठलीही पर्वा न करता बेशिस्त लोकांना वठणीवर आणण्यासाठी पोलिस दल दिवस-रात्र पहारा देत आहे. त्यांनाही परिवार आहे. त्यांच्या परिवाराची काळजी कोण करणार?
हातात एका काठी अन् दुसऱ्या हाती समाजभान..
घरी आहे फॅमिली, तरी रस्त्यावर उभा आहे ठाम..
भीती आहेच करोना होण्याची, पण गरज आहे तुझी..
म्हणून आवाहन करतो तुम्हाला, बसा घरातच काही काळ..
अन्यथा मिळेल लाठीचा प्रसाद, अन् खरच भरकटलेल्यांना जेवण
हरजीत सिंह वधवा
उद्योजक, अहमदनगर, संपर्क 9423162727