मुंबई – नागपूरच्या मिहान प्रकल्पात अनिल अंबानी आणि बाबा रामदेव यांनी मोठे प्रकल्प उभारण्यासाठी मोठे भुखंड अत्यंत नाममात्र दरात दिले गेले. तेथे प्रकल्प कधी उभे राहणार आणि स्थानिक लोकांना रोजगार कधी मिळणार असा सवाल कॉंग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनी आज विधानसभेत उपस्थित करून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला.
पटोले म्हणाले की, बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या नागपुरातील प्रकल्पात 50 हजार लोकांच्या रोजगाराची निर्मीती होईल आणि स्थानिक जनतेचा पाच हजार कोटी रूपयांचा माल खरेदी केला जाणार होता. त्यासाठी त्यांना 230 एकर जमीन देण्यात आली होती. त्याचे काय झाले असा सवाल त्यांनी केला. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्सलाही 289 एकर जमीन देण्यात आली आहे. त्यातून पंधरा हजार रोजगार निर्मीती होईल असे सांगण्यात आले होते आज चार वर्षे होऊन गेली त्यावर हे प्रकल्प अजून का उभे राहूू शकले नाहीत असा सवालही त्यांनी केला. अत्यंत नाममात्र दरात 66 वर्षांसाठी या जमीनी देण्यात आल्या आहेत पण त्यावर अजून कोणताच प्रकल्प उभा राहु शकलेला नाही तो मुद्दा धरून पटोले यांनी हा विषय आज सभागृहात उपस्थित केला.