नवी दिल्ली : भाजपात प्रवेश केल्याबद्दल काँग्रेस नेत्यांच्या निशाण्यावर असणारे जितीन प्रसाद यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले असून टीकेलाही उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी काँग्रसेचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शिवसेनेसोबत युती केली तेव्हा नेमकी पक्षाची काय विचारसरणी काय होती? असा सवाल त्यांनी केली आहे.
“ते वरिष्ठ नेते आहेत. विचारसरणी असे काही नसून देशहित ही एकच विचारसरणी असते. काँग्रेसने शिवसेनेसोबत युती केली तेव्हा विचारसरणी कुठे होती? पश्चिम बंगालमध्ये डाव्यांसोबत गेले तेव्हा काय विचारसरणी होती? आणि त्याच वेळेला ते केरळमध्ये डाव्यांसोबत लढत होते,” असे सांगत जितीन प्रसाद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीविरोधात वक्तव्यं केल्याने पक्षाचं नशीब बदलणार नाही असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.
जितीन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशावर टीका करताना कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं की, “भारतीय राजकारणात आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे अशापद्दतीचे निर्णय विचारसणीच्या आधारे अजिबात घेतले जात नाहीत. याआधी हे ‘आया राम गया राम’ होतं, आतात ‘प्रसाद राम राजकारण’ आहे”.
एकेकाळी राहुल गांधी यांचे कट्टर समर्थक असलेले प्रसाद हे बंडखोर ‘जी-२३’ नेत्यांच्या गटात सहभागी झाले होते. सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षात महत्वाचे बदल घडवण्यासंबंधी पत्र लिहिणाऱ्या जितीन प्रसाद यांच्यासह कपिल सिब्बल यांचा समावेश होता.