नवी दिल्ली – देशातील जनतेला करोनाची लस देण्याबाबत सरकारकडून सतत वेगवेगळी माहिती आणि दावे केले जात आहेत आणि आता सरकारकडून त्या विषयीची जबाबदारीही झटकणारी विधाने सुरू झाली आहेत तो धागा पकडून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा मोदी सरकारला कोंडित पकडणारे ट्विट केले आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, प्रत्येकाला लस मिळेल असे विधान मोदींनी आधी केले होते. त्यानंतर बिहारच्या निवडणुकीत बिहार मधील प्रत्येकाला मोफत लस दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आणि आता प्रत्येकाला लस दिली जाईल असे भारत सरकारने कधीही म्हटलेले नाही, असे सांगितले जाऊ लागले आहे. यात पंतप्रधानांची नेमकी भूमिका काय आहे असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.