मुंबई : मुंबई हे देशातील अनेकांचे ‘स्वप्नांचे शहर’ आहे. जिथे कोट्यावधी लोक लोकल ट्रेनममधून प्रवास करत आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मुंबई म्हणजे उच्च प्रदूषण पातळी, पाणीटंचाई, कधीही न संपणारी रहदारी, असह्य उष्णता, आणि पावसाळ्यात या महानगराला पावसाचा बसणार फटका…असेच समीकरण झाले आहे. याच परिस्थितीत आजही कोट्यवधी लोक आपले स्वप्न पूर्ण करण्याचा विचार उराशी घेऊन झोपतात…मुंबईतीलच पारडीवाला कुटुंब हे या कोट्यवधी लोकांपेक्षा काही वेगळे नव्हते. या कुटुंबातील दोन तरुणांनी रोजच्या लाईफ स्टाईल ला कंटाळून निसर्गाच्या सानिध्यात पण निसर्गातीळ कोणत्याही घटकाला धक्का न लावता मुंबईपासून जवळच असणाऱ्या एका घराची निर्मिती केली आहे. मात्र हे घर काही साधंसूद नाही त्याची निर्मितीच वेगळी आहे त्यामुळेच या घराला ‘ऑरेंज बॉक्स’ म्हणून ओळखले जाते.
पारडीवाला हे कुटुंब मुंबईतील पॉश अशा कफ परेड भागात वास्तव्यास आहे. मात्र त्यांना या भागात स्वच्छ हवा, पाणी आणि सेंद्रिय अन्न मिळत नसल्याची खंत सतावत होती. दरम्यान, या जीवनशैलीत हे सर्व साध्य करणे शक्य नव्हते त्यामुळे या कुटुंबातीळ दोन तरुण मुले मिशेल आणि मिखाईल यांनी शहरापासून लांब जाण्याचा विचार केला. त्यासाठी शहरापासून ९० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आणि समुद्र किनारपट्टी लाभलेल्याअलिबागची निवड त्यांनी केली. याठिकाणी त्यांनी वर्षातील काही दिवस निवांत निर्सगाच्या सानिध्यात घालण्यासाठी एक असे घर तयार करण्याचा निर्णय घेतला ज्यात विटा, सिमेंट आणि वाळू अशा कोणत्याही गोष्टींचा वापर केला जाऊ नये … त्यासाठी त्यांनी शिपिंग कंटेनरचा वापर करण्याचा निर्णय घेतला. हे त्यांचं स्वप्नातील घर तयारीसाठी त्यांनी एक एकर भूखंडामध्ये आरामदायक, सौंदर्य आणि सर्वात महत्वाचे पर्यावरणपूरक असे एक खास सुट्टीसाठी घर बांधण्याचे ठरविले. मिशेल आणि मिखाईल या घरातील दोन तरुण सदस्यांनी या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारली.
मिशेल आणि मिखाईल या दोन्ही भावानी आपला पूर्वीचा चांगल्या पगाराची नोकरी सोडली. त्यानंतर या दोघांनाही इको फ्रेंडली घराची कल्पना सुचली. आपलं स्वप्नातील घर पूर्ण करण्यासाठी दोघांनीही आपली नोकरी सोडली आणि पूर्ण लक्ष घर निर्मितीवर केंद्रित केले. त्यासाठी त्यांनी इको फ्रेंडली उत्पादने तयार करणाऱ्या ‘ट्रीवेअर’ या कंपनीची निर्मिती केली. घर बांधण्यासाठी अपारंपरिक मार्ग निवडण्यामागील कारणांबद्दल सांगताना निलेश यांनी, कंपनीच्या सुरुवातीच्या काळापासून अलिबागमध्ये इको-फ्रेंडली घर बांधण्याची कल्पना आमच्याकडे होती आणि शेवटी, २०१८ मध्ये आम्ही त्यावर काम सुरू केले. बांधकाम करण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध होते, परंतु यातही त्यांनी शिपिंग कंटेनरचा पर्याय निवडला जो पर्यावरणाच्या दृष्टीने सर्वोत्तम होता.
त्याचे फायदे सांगताना मिशल म्हणतात, “इतर पुन्हा वापरात येणाऱ्या किंवा पर्यावरणास अनुकूल सामग्रीच्या तुलनेत शिपिंग कंटेनर अधिक टिकाऊ आणि कठीण असतात. प्रत्येक वेळी जेव्हा कंटेनरचे पुन्हा वापर केले जाते तेव्हा हजारो किलो स्टीलचा पुन्हा खर्ची पडली. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कंटेनर वापरताना विटा किंवा सिमेंटसारख्या इतर बांधकाम साहित्याची आवश्यकता नसते, ज्यामुळे एकूण कार्बनचे फूटप्रिंट कमी होते.” शिपिंग कंटेनर हा कच्चा माल म्हणून निवडल्यानंतर, त्यांनी एका आर्किटेक्टकडे संपर्क साधला. त्यानंतर पनवेल यार्डला भेट देऊन तेथून आम्ही सहा शिपिंग कंटेनर खरेदी केले. त्या प्रत्येकाची लांबी 40 फूट आणि रुंदी 8 फूट आहे. पनवेलहून शिपिंग कंटेनर हायड्रो क्रेनचा वापर करून अलिबागमध्ये आणण्यात आले. यातून तीन बेडरूम ,हॉल आणि 1500 चौरस फूट टेरेस चे घर टायर करण्यात आले. त्यासोबतच घरामध्ये अंगण आहे. मनोरंजयासाठी मोकळी जागा, अंगणआहे. या सर्वात महत्वाचे म्हणजे याठिकाणी पावसाचे पाणी वाचवण्यासाठीची खास सोय देखील करण्यात आली आहे.
आमचे घर कोरडे आहे त्यामुळे आम्ही अंगणात असलेल्या तलावामध्ये पावसाचे पाणी एकत्रित करून त्याचा वापर करण्यात येतो असे मिशेलने सांगितले. तलावाचे काही पाणी भूजल सारण्या रिचार्ज करण्यासाठी जवळच्या बोअरवेलला पाठविले जाते. दरम्यान, मिशेलने या घरात दोन महिने घालवेल असून वेगवेगळ्या हवामान परिस्थितीमुळे घराच्या बाह्य आणि आतील भागावर कसा परिणाम होत आहे हे त्यांनी पहिले. त्यातून सकारात्मक परिणाम समोर आले आहेत.
दरम्यान, या घरात सुट्टीसाठी लोक राहू शकता तसेच लोकांसाठी योग, अपसायकलिंग कचरा, वृक्षारोपण इत्यादी सारख्या शनिवार व रविवार कार्यशाळेचे आयोजन करण्याची आमची योजना असल्याचे मिशेल आणि मिखाईल या दोन्ही भवानी म्हटलं आहे. “निसर्गाच्या अनुषंगाने जीवन जगण्याच्या मार्गांबद्दल लोकांना जाणीव करून देणे, हा निश्चय करण्याचा विचार आहे.”