राहू(प्रतिनिधी) – तुम्ही देशाचे संरक्षण व कृषी मंत्री असताना तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केले? असे म्हणत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन ( Nirmala Sitharaman) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांचे नाव न घेता जोरदार निशाणा साधला. त्या राहू येथे झालेल्या महिला मेळाव्यात बोलत होत्या.
फक्त घराणे शाही व आपल्या पार्टी साठी काम केले. आपल्या मर्जीतील लोकांना पदे देऊन पूर्ण पक्षावर फक्त आपलेच नियंत्रण कसे राहील हेच फक्त पाहिले. स्वर्गीय मनोहर पर्रीकर संरक्षण मंत्री असताना डिफेन्स एक्स्पो गोव्याला भरवून अनके संधी निर्माण केल्या,त्याच धर्तीवर तामिळनाडू मध्ये संरक्षण प्रदर्शन भरवून त्या माध्यमातून डिफेन्स कॉरिडॉर ची निर्मिती केली.
परंतु तुम्ही संरक्षण मंत्री असताना महाराष्ट्राससाठी काय केले, हे मी तुम्हाला बारामतीच्या भूमीत येऊन विचारते आहे. माताजी-पिताजी व भाई या भतीजा याच्या पुढे तुम्ही व तुमची पार्टी कधी गेलीच नाही अशा शब्दात त्यांनी टीका केली.
तसेच मागील सरकारने केंद्राच्या योजना या केंद्राला श्रेय मिळु नये म्हणून अनेक योजनांना खोडा घातला, परंतुआता ती कामे व्यवस्तीत मार्गी लागणार आहेत. प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून 80 कोटी गरिब जनतेला अन्न-धान्य पुरविण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. महिलांना केंद्र बिंदू मानून अनेक योजनावर सरकार काम करत आहे व अनेक योजना चालूं आहेत. त्याचाच भाग म्हणून ‘बेटी बचाव -बेटी पढाव’ सारख्या योजना चालू आहेत.