मुंबई – जगभरासह भारतामध्ये देखील कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोनाला वेळीच रोखण्यासाठी सध्या देशभरामध्ये लॉक डाऊनचा लागू करण्यात आले होते.
या दरम्यान लॉक डाऊनमुळे अख्खा देश ठप्प झाला असून हाताला रोजगार नसल्याने अनेकांना आर्थिक चिंतेने ग्रासले आहे. अशातच महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने राज्यातील भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना मोठा दिलासा आहे. मात्र लॉकडाऊन शिथिल होताच घरभाड्याबाबत घरमालकांनी पुन्हा घर भाड्याची मागणी भाडेकडून कडे केली आहे. याबाबत घरमालकांना रोहित पवार यांनी पोस्ट तसेच पत्रकाद्वारे द्वारे घर भाडे न घेण्याची विनंती केली आहे.
घरमालकांना पत्रातून काय म्हणाले रोहित पवार
समस्त घरमालक बंधू,
सप्रेम नमस्कार!
आज मी तुम्हाला हे पत्र लिहितोय, त्याला कारणही तसंच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीही घरभाड्याबाबत मी आपल्याला विनंती केली आहे. काहीजणांना वाटंत असेल की मी वारंवार हे का बोलतोय पण गेल्या काही दिवसांपासून मला असंख्य फोन आले. हे लोक भाड्याबाबत अगदी कळवळून बोलत होते, काहींना तर फोनवरच आपले अश्रू आवरणंही कठीण झालं होतं, म्हणून आपल्याशी हा पत्रप्रपंच..