पोर्ट ऑफ स्पेन : विराट कोहलीचे शतक आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात निर्धारीत 50 षटकांत 7 बाद 279 धावांची मजल मारत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 280 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Innings Break!
A stupendous 120 from @imVkohli followed by a gritty knock of 71 from Iyer guides #TeamIndia to a total of 279/7.
Live – https://t.co/HYucfevoBN #WIvIND pic.twitter.com/ZNI5V2k1wh
— BCCI (@BCCI) August 11, 2019
भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कॉट्रेलने धवनला अवघ्या 2 धावांवर तंबूत धाडत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्माच्या साथीने भारताचा डावा सावरला. या जोडीने अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर रोहित 18 धावांवर बाद झाला. चेसने त्याच्या रुपात भारताला दुसरा धक्का दिला. त्याच्या जागी आलेला पंत 20 धावांची भर घालून बाद झाला. ब्रेथवेटने त्याला चकवले.
त्यानंतर कर्णधार विराटने युवा फलंदाज श्रेयस अय्यरच्या साथीने भारताचा डाव पुढे नेला. शतकी खेळी करणाऱ्या कोहलीला बाद करत ब्रेथवेटने आपल्या संघाला चौथे यश मिळवून दिले. यावेळी कोहलीने 120 धावांची खेळी केली. कोहली बाद झाल्यानंतर अय्यरही 71 धावा करुन परतल्याने भारताला पाचवा धक्का बसला. यानंतर ठरावीक अंतराने एक एक गडी बाद होत गेल्याने भारताला 279 धावांचीच मजल मारता आली.