कोलकाता – पहिल्या सामन्यात सहज विजय मिळवलेल्या भारतीय संघाला आज येथे होत असलेल्या वेस्ट इंडीजविरुद्धचा दुसरा टी-20 सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेण्याची संधी आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 6 गडी राखून विजय मिळवला होता. भारतीय संघाबाबत बोलायचे झाले तर फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व नेतृत्व या सर्वच स्तरावर सरस कामगिरी झाली. याउलट वेस्ट इंडीजच्या प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
भारत विरूध्द वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यास काहीच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा वेस्ट इंडिजच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफेक (टाॅस) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
Toss news from Eden Gardens 👇
West Indies have opted to bowl in the second #INDvWI T20I. pic.twitter.com/tLVJ31O1Ip
— ICC (@ICC) February 18, 2022
दरम्यान, एकदिवसीय मालिका भारतीय संघाने 3-0 असा निर्विवाद विजय प्राप्त केला होता. तसेच आता भारतीय संघाला या दुसऱ्या सामन्यासह ही मालिकाही जिंकण्याची नामी संधी आहे.
भारतीय संघ – रोहित शर्मा, इशान किशन, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, दीपक चाहर, वेंकटेश अय्यर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रवि बिश्नोई आणि युजवेंद्र चहल.
वेस्ट इंडिज संघ – ब्रँडन किंग, काइल मेयर्स, निकोलस पूरन, रॉस्टन चेज, रॉवमॅन पॉवेल, कायरन पोलार्ड, जेसन होल्डर, ओडीन स्मिथ, अकील हुसैन, रोमारियो शेफर्ड, शेल्डर कॉटरेल.