West Bengal : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ममता बँनर्जीं यांच्या टीएमसी पक्षात अंतर्गत नाराजी वाढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बुधवारी पक्षाने आयोजित केलेल्या आंदोलनाकडे तब्बल 45 आमदारांनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात संभाव्य फुटीच्या चर्चांना उधाण आले आहे. (West Bengal) 80 पैकी फक्त 35 आमदार उपस्थित मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचार आणि फेरीवाल्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ टीएमसीने विधानसभा परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन आयोजित केले होते. (West Bengal) या आंदोलनात शोभनदेव चट्टोपाध्याय, नयना बॅनर्जी, कुणाल घोष आणि ऋतब्रत बॅनर्जी यांच्यासह 80 पैकी केवळ 35 आमदार सहभागी झाले. त्यामुळे पक्षातील नाराजी उघड झाल्याची चर्चा रंगली आहे. (West Bengal) ‘अंतर्गत कलह नाही’ मात्र, टीएमसी नेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी पक्षात अंतर्गत कलह असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “अनेक आमदार हिंसाचारग्रस्त भागांमध्ये कार्यकर्त्यांसोबत व्यस्त होते. तसेच आंदोलनाची घोषणा केवळ एका दिवसाच्या नोटिशीवर करण्यात आली होती. त्यामुळे दूरच्या भागातील आमदारांना उपस्थित राहणे शक्य झाले नाही.” (West Bengal) बैठकीत नाराजी व्यक्त सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी ममता बॅनर्जी आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत काही आमदारांनी पक्ष नेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त केली. (West Bengal) पराभवानंतर पक्षाने रस्त्यावर उतरून जनतेमध्ये जाण्याऐवजी बंद खोलीतील बैठकींवर भर दिल्याची टीका काही आमदारांनी केली. “जनाधार परत मिळवण्यासाठी थेट लोकांमध्ये जाणे आवश्यक आहे,” असे मतही काही आमदारांनी बैठकीत मांडल्याचे समजते. (West Bengal) आगामी काळात आक्रमक भूमिका? या पार्श्वभूमीवर आगामी काळात टीएमसी अधिक आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरून आंदोलने करताना दिसू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पराभवानंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ममता बॅनर्जी आणि पक्ष नेतृत्व आता नवीन रणनीती आखण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. (West Bengal)