मुंबई – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. न्यूझीलंडच्या एजाज पटेलने मुंबई कसोटीत भारताच्या पहिल्या डावात सर्व 10 विकेट घेत इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटच्या एका डावात 10 बळी घेणारा तो जगातील तिसरा आणि न्यूझीलंडमधील पहिला गोलंदाज ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी एजाजसाठी एक ट्वीट केले आहे. ”कसोटीत एकाच डावात दहा बळी मिळवण्याची दमदार कामगिरी केल्याबद्दल एजाज पटेलचे अभिनंदन. मुंबईत जन्मलेला आणि आता न्यूझीलंड क्रिकेट संघाचा भाग असल्यामुळे आपल्याला अभिमानाची भावना आहे. अशी कामगिरी करणारा केवळ कसोटी क्रिकेटमधील तिसरा क्रिकेटपटू”, असे पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.
Congratulations Ajaz Patel on your remarkable achievement taking 10 wickets in an innings of a Test Match.
Born in Mumbai and now part of New Zealand Cricket team gives us a sense of pride as you are only the 3rd cricketer to do so in Test Cricket.— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 4, 2021
दरम्यान, जिम लेकर आणि अनिल कुंबळेनंतर ही कामगिरी करणारा एजाज पटेल तिसरा गोलंदाज ठरला आहे. जिम लेकरने 1956 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टर कसोटीच्या एका डावात 10 बळी घेतले होते. त्यानंतर भारतीय लेगस्पिनर अनिल कुंबळेने 1999 मध्ये पाकिस्तानविरुद्ध दिल्लीत झालेल्या कसोटी सामन्यात कुंबळेने एका डावात सर्व 10 फलंदाजांना बाद केले होते.
जिम लेकर वि. ऑस्ट्रेलिया 1956
अनिल कुंबळे वि. पाकिस्तान 1999
एजाज पटेल वि. भारत 2021