पुण्यातील राजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांची शपथ
पुणे – राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी मान्य केल्यामुळे सुटीच्या मोबदल्यात अधिक काम करण्यासाठी वचनबद्ध राहण्याची शपथ, पुण्यातील राजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेतली.
राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा केल्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी वाढली आहे. ती जबाबदारी अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्याची शपथ अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, राजपत्रित अधिकारी महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्षा तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल वाघमारे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.