मुंबई – राज्यात वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. राज्यात पुन्हा लॉकडाऊन केला जाणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र लॉकडाऊन नसला तरी विकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू आणि इतर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. तसेच इतर दिवशी नाईट कर्फ्यू असेल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियंमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकारपरिषदेतील महत्वाचे मुद्दे –
- राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करा.
*राज्यात रुग्ण का वाढताहेत याबाबत विचारविनिमय करणे आवश्यक.
*सरकारने जाहीर केलेल्या नियमांबाबत भाजप सहकार्य करणार..
*रुग्णालयांमध्ये बेड्सची चणचण भासत आहे त्याकडे सरकारने गांभिर्याने लक्ष द्यावे. - लाॅकडाऊन आणि मिनी लाॅकडाऊनमध्ये विज कापणीची मोहीम थांबवावी.
- ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था भक्कम करणे आवश्यक.
*गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना जगण्यासाठी राज्य सरकारने मदत करावी.
*केंद्र सरकारने केलेली मदत कीती भरीव होती याचे दाखले आहेत. - केंद्राने केलेली मदत कुठे गेली? असा प्रश्न राज्य सरकारला विचारला पाहिजे.