ओतूर (प्रतिनिधी) – सध्या पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ओतूर येथिल बसस्थानकात पडलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असून, या बसस्थानकाला एक प्रकारे बेटाचे स्वरूप आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बसस्थानकात प्रवेश करणे कठीण झाले आहे.
तसेच, या खडयांमुळे वाहनांना आणि पादचारींना जाणे येणे अवघड झालेले आहे. या त्रासाला प्रवासी जनता कंटाळली असताना मात्र एस.टी.प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे.