मुंबई – आजपासून पुढील पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज उत्तर कोकण, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यावत आली आहे.
District wise weather warnings issued by IMD Mumbai today for 5 days. Pl see @RMC_Mumbai pic.twitter.com/8kQUaxJNkj
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 15, 2021
आज (दि. 15) पुणे, मुंबई, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी या सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
त्याचबरोबर मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्याच्या साथीनं मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर याठिकाणी 30-40 किमी प्रतितास वेगाने वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, उद्या (16 जून) रोजी सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई आणि पुण्यात सामान्य हवामान असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.