मुंबई – भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तसेच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईत 7 ते 10 ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर 6 ते 10 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भात 7 ते 10 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात 9 आणि 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.