नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील इंदौर शहरात आज पहाटेच एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शहरातील स्वर्णबाग कॉलनीत एका दुमजली घराला भीषण आग लागून सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली.
आग लागली त्यावेळी या घरात राहणारे लोक गाढ झोपेत होते, बहुतेकांचा झोपेत भाजल्याने आणि गुदमरून मृत्यू झाला. या आगीत आठ जण गंभीर जखमी झाले. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप आगीचे कारण कळू शकलेले नाही. ही वसाहत इंदूरच्या विजय नगर भागात आहे. ही आगीची घटना शुक्रवार-शनिवारी मध्यरात्री घडली.
Madhya Pradesh | Five people charred to death after a fire broke out in a two-storey building in Indore.
The Fire official says, “The fire might have started through a short circuit. It took us 3 hours to bring the fire under control. pic.twitter.com/FNDeDWgm1x
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) May 7, 2022
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तसेच विजय नगर पोलीस स्टेशनने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. पोलिसांनी मृतांचे मृतदेह रुग्णालयात पाठवले. आगीत बळी गेलेले बहुतांश रूग्ण भाडेकरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
इंदौर पोलीस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा यांनी सात जणांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी. आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे तीन तास लागले. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमध्ये शॉर्टसर्किटने आग लागली आणि नंतर हळूहळू संपूर्ण घरात पसरली. या आगीने इतके भयंकर रूप धारण केले की कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. आणि सात जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.