नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून देशाच्या विकासदरात सातत्याने घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मोदीसरकारवार सर्वच स्थरांतून टीका होत असल्याचे पाहायला मिळत आहे. देशाचा सकल घरगुती उत्पादन दर हा ५ टाक्यांवरून ४.५ टाक्यांवर आला असून, गट वर्षीच्या तुलनेत हा दर 2.6 टकक्यांनी घसरला आहे. त्यामुळे सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे.
त्यातच उद्योगपती बजाज यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उद्योगपती खरे बोलायला घाबरत असल्याचे वक्तव्य़ केले होते. यावरून मंदीच्या छायेत असलेल्या उद्योगक्षेत्रातील खदखद यावेळी व्यक्त झाल्याचे पहायला मिळाले होते.
दरम्यान लोकसभेमध्ये जीडीपीवरून चर्चा सुरू असताना काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी ‘अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना निर्मला या नावाच्य़ा जागी निर्बला का म्हणू नये, असा कधी कधी विचार करत असल्याचा’ टोला लगावला होता. तसेच ‘तुम्ही मंत्री पदावर तर आहात पण जे तुमच्या मनात आहे ते कधी सांगू शकता की नाही’, अशी शंकाही उपस्थित केली आहे.
Nishikant Dubey, BJP MP in Lok Sabha: Aaj ki nai theory hai ki sustainable economic welfare aam aadmi ka ho raha hai ke nahi ho raha. GDP se zyada important hai ke sustainable development, happiness ho raha hai ke nahi ho raha. https://t.co/GE0LNeyLO6
— ANI (@ANI) December 2, 2019
तर दुसरीकडे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ‘1934 मध्ये जिडीपी अस्थित्वात आला असून, त्या आधी कोणताही जीडीपी नव्हता. जीडीपीला केवळ बायबल, रामायण किंवा महाभारत मानने खरे नाही. तसेच भविष्यात जीडीपीचा काही उपयोगही राहणार नाही. आजच्या मिमांसेनुसार शाश्वत आर्थिक कल्याण सामान्यांचे होत आहे की नाही. जीडीपी पेक्षा शाश्वत विकास, आनंद होत आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे’, असे म्हटले आहे.