शिंदे वासुली (प्रतिनिधी) – अखेर “भामा आसखेडग्रस्तां’नी आज सकाळी 11 वाजेपासून आर या पारच्या लढाईला सुरुवात केली आहे. करंजविहिरे येथील जलवाहिनीच्या कामाठिकाणी धरणग्रस्तांच्या एका ग्रुपने धरणे आंदोलन सुरू केले. परंतु पोलीस प्रशासनाने आसखेड खुर्द फाटा, जलवाहिनी परिसर, तळशेत, धामणे फाटा, करंजविहीरे आदी ठिकाणी कडक नाकाबंदी केली होती.
आंदोलनकर्त्यांनी जलवाहिनेचे काम बंद करा नाहीतर आंदोलन सुरूच ठेवणार अथवा आमच्यावर कारवाई करा असा आक्रमक पवित्रा घेतला.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1313999355606433/
ठिकठिकाणी नाकाबंदी करुन आंदोलकांना एकत्र येऊ न देण्याची पोलीस प्रशासन खबरदारी घेत होते. सरतेशेवटी तळशेत जवळ सर्व प्रकल्पग्रसत शेतकरी एकत्र येऊन शासनाचा निषेध करत आंदोलन सुरू केले; परंतु पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवाहन केले. व सर्व धरणग्रस्तांनी चाकण पोलीस ठाण्यामध्ये जाऊन हल्ला बोल करण्याचा विचाराने पिंजरा गाडीत बसले. परंतु पोलिसांनी चाकणकडे निघालेल्या गाड्यामध्येच थांबवून दुसरीकडेच नेण्याचा प्रयत्न केला.
वेळीच पोलिसांचा डाव ओळखून प्रकल्पग्रस्तांनी गाड्यांमधून उड्या घेत जलवाहिनीकडे धाव घेतली. परंतु पोलीस प्रशासन शेतकरी जमावाची पांगापांग करण्यात यशस्वी झाले. दरम्यान, काही आंदोलक महिला व पुरुष काट्याकुट्यातून, आडमार्गाने, शेतातून जलवाहिनीवर येऊन धडकले. व जलवाहिनीच्या पाइपावर येऊन बसले व त्यामुळे जलवाहिनेचे काम ठप्प झाले.
वयोवृद्ध शेतकरी जखमी…
एक वयोवृद्ध शेतकरी गबाजी सातपुते आंदोलनादरम्यान धामणे घाटात पिंजरा गाडीतून पडल्याने गंभीर जखमी झाले असून करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहे.
आज आम्ही थांबणार नाही. पवन मावळासारख्या गोळ्या खायला तयार आहे. शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असून पोलीस प्रशासनाकडून सहाय्यक आयुक्त राम जाधव व चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी कोणत्याही परिस्थितीत काम थांबवले जाणार नाही. तसा आदेश नाही. असे ठाम सांगितल्याने आंदोलक अधिक आक्रमक झाले.