वाल्हे -आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावर प्रत्येक पालखी तळावर संतांच्या आवडीची पाच झाडे व विठ्ठलाच्या प्रतिकाची आठ झाडे लावली जाणार आहे. त्याचे संगोपनही केले जाणार आहे, असे प्रतिपादन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले. वाल्हे (ता. पुरंदर) येथे हरित वारी उपक्रमाअंतर्गत आळंदी देवस्थान, देवराई संस्थेच्या पुढाकारातून पालखी तळावर वृक्षारोपणप्रसंगी ते बोलत होते.
वाल्हे येथील पालखीतळावर प्रेरणादायी कार्यक्रम होणार असल्याचे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, देहूचे अध्यक्ष मधुकर मोरे, विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त शिवाजी मोरे, अजित मोरे, सरपंच अमोल खवले, सुकलवाडीच्या सरपंच जयश्री चव्हाण, सूर्यकांत भुजबळ, प्रा. संतोष नवले, पोपट पवार, संदेश पवार, सुरेखा भुजबळ, चंद्रशेखर दुर्गाडे, हवालदार हनुमंत गार्डी उपस्थित होते.