राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सत्ता स्थापणेच्या चर्चांना पुर्णविराम
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत पण राज्यात कोण सरकार बनवेल हे चित्र अजून स्पष्ट झालेले नाही. राज्यात भाजप-शिवसेनेने एकत्रितपणे सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे, परंतु दोन्ही पक्षांमधील सत्ता वाटणी अद्याप झालेली नाही. त्याच बरोबर असेही वृत्त आहे की राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस (राष्ट्रवादी) राज्यात सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देऊ शकते. परंतू, आता या सर्व चर्चांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पुर्णविराम देण्यात आला आहे. आम्ही राज्यात विरोधी पक्ष म्हणून काम करणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
Praful Patel,NCP: I want to make it clear that we will be in opposition and play the role of a strong opposition. We don’t want to have any role in Govt formation, BJP-Shiv Sena have got the mandate,so best wishes to them. #MaharashtraAssemblyPolls2019 pic.twitter.com/BAynSPAB78
— ANI (@ANI) October 26, 2019
दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी, पक्षाने आपण विरोधी पक्षातच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे त्यामुळे आम्ही कोणाबरोबर सत्ता स्थापण करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच ‘मला हे स्पष्ट करायचे आहे की आम्ही विरोधात राहू. आम्ही सशक्त विरोधी भूमिकेत राहू. आम्हाला सरकार स्थापनेत हातभार लावायचा नाही. भाजप-शिवसेनेला बहुमत मिळाले. त्यामुळे त्यांना शुभेच्छा.’ असे म्हणत त्यांनी सर्वच चर्चांना पुर्णविराम दिला आहे.
कॉंग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय नामदेवराव वडट्टीवार म्हणाले की, ‘आम्हाला विरोधी पक्षाची भूमिका देण्यात आली आहे आणि आम्ही ती भूमिका बजावू, पण जर तेथे चर्चा करण्याचा पर्याय असेल तर शिवसेनेने आमच्याकडे यावे. त्यांनी अद्याप आमच्याशी संपर्क साधलेला नाही. ‘