पुणे : आज सकाळपासून आंबिल ओढा परिसरात केलेली कारवाई ही सर्व नियम पाळून केलेली असल्याचे स्पष्टीकरण महापालिकेने दिले आहे. यासंदर्भात नागरिकांना अनेकदा वैयक्तिक आणि वर्तमानपत्रांमधूनही नोटिसा पाठवण्यात आल्या असून त्यानुसार ही कारवाई करण्यात अली आल्याचे पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त अविनाश सपकाळ यांनी म्हटले आहे.
ओढा परिसरातील कारवाईबाबत बोलताना सपकाळ यांनी, यासंदर्भात पालिकेच्या आयुक्तांसोबतही तीन ते चार वेळा बैठका झाल्या आहेत. त्यामुळे इथल्या सर्व नागरिकांना हे माहित आहे की आपलं पुनर्वसन जवळचं २०० मीटरवर असलेल्या राजेंद्रनगरमध्ये होणार आहे. सर्वांना तिकडे सुसज्ज फ्लॅट्स पालिकेने दिलेले आहेत. उद्या नाल्याला पूर येऊन काही होऊ नये यासाठी सध्या हे काम करणं आवश्यक आहे.
तर दुसरीकडे आपल्याला महापालिकेची कोणतीही नोटीस मिळालेली नसून केवळ बिल्डरने आपल्याला नोटीस पाठवल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या नोटिसीची प्रतही नागरिकांनी दाखवली आहे.
संबंधित बातम्या :
आक्रोश! पुण्यातील आंबील ओढा परिसराचा वाद नेमका काय आहे? वाचा सविस्तर
#Video : ‘पोलीस काकांनी माझ्या घरांच्या ना मारलं… माझ घर पाडलं, आम्ही कुठे जायचं?’
पुणे! आंबील ओढा कारवाई; १०० हुन अधिक जण पोलिसांच्या ताब्यात