नवी दिल्ली : सरहद्दीवर चीनच्या कुरापतीमुळे आपले सैनिक मरत असताना चीनमधून आयात करणे बरोबर होणार नाही. त्यासाठी देशात तयार होणाऱ्या उत्पादनावर निष्ठा दाखविण्याची गरज असल्याचे जेएसडब्ल्यू समूहाचे प्रमुख सज्जन जिंदाल यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात भारतातील उद्योगांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ते दूर करून सर्व उद्योजकांनी एकत्रित येऊन चीनमधून होणारी आयात कमी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे चीन सरहद्दीवर बेजबाबदारपणे वागणार नाही असे त्यांना वाटते. आत्मनिर्भर भारत अभियानामुळे दीर्घ पल्ल्यात आपल्याला स्वावलंबी होण्यास मदत मिळेल.