नवी दिल्ली, दि. 14 – केंद्र सरकारकडे अजून कोविड लसीकरणाच्या संबंधात कोणतेही ठोस धोरण नसल्याने कॉंग्रेसकडून मोदी सरकारवर सतत टीका केली जात आहे. आज पुन्हा एकदा यावरून मोदी सरकारला लक्ष्य करताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, आज देशात केंद्र सरकारच्या लसीकरणच्या धोरणामुळेच मोठी समस्या निर्माण झाली आहे.
ही लस केंद्राने सर्व देशभर मोफतच दिली पाहिजे. त्यासाठी सरकारने लसींच्या खरेदीचे काम केंद्रीय पद्धतीने करावे आणि त्याचे वितरण विक्रेंद्रीत पद्धतीने करावे. लस विकत घ्यायला लावणे हे देशवासियांना परवडणारे नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारची लस विषयक भूमिका ही भेदभावावर आधारीत आहे असेही कॉंग्रेसकडून सतत सांगितले जात आहे. अनेक राज्यांमध्ये सध्या लसींच्या अभावी 18 ते 45 वयोगटातील लोकांचे लसीकरण थांबले आहे.