मुंबई – गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये ज्याप्रमाणे लोक सरपंचपद वाटून घेतात त्याप्रमाणेच महाविकास आघाडीतल्या पक्षांनी मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं, असा टोमणा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी मारला आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले,’दोन वर्षापूर्वी आमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेचं टाळं उघडलं आणि शिवसेनेला सत्ता मिळाली, तसेच भाजपच्या सत्तेला टाळं लागल.” असं म्हणत त्यांनी दानवेंना सडेतोड उत्तर दिल आहे.
दरम्यान,रावसाहेब दानवे म्हणाले होते, ‘महाविकास आघाडीमधल्या मुख्यमंत्रीपदाबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. याबद्दल बोलताना ‘पटोले यांना येत्या तीन वर्षात मुख्यमंत्री होण्याची संधी आहे आणि येत्या तीन वर्षात अजित पवारांनीही मुख्यमंत्री व्हावं, त्यासाठी शुभेच्छा आहेत,’ असा टोला त्यांनी यावेळी लगावला होता. ते एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बोलत होते.
मुख्यमंत्री होण्यासाठी पटोले आणि अजित पवार यांच्याकडे तीन वर्षांचा काळ असून त्यानंतर 2024मध्ये भाजप स्वबळावर सत्तेवर आल्याने त्यांना संधी मिळणार नसल्याचंही दानवेंनी म्हणाले होते.