मुख्यमंत्र्यांचे शरद पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर
मुंबई : कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेत्यांना आपल्या सत्तेचा गैरवापर करत आपल्या पक्षात भाजप करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केला. आता त्यालाच भाजपचे नेत्यांनी उत्तर द्यायला सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शरद पवार यांना उत्तर देत आम्हाला कोणावर कसालाही दबाव टाकून पक्षात घेण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेच भाजपच्या संपर्कात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शरद पवारांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रत्युत्तर दिले. ज्या लोकांवर ईडीची चौकशी सुरु आहे अशांना पक्षात प्रवेश मिळणार नसून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात नेते राहण्यास का तयार नाही याचे आत्मचिंतन शरद पवार यांनी स्वत: करावे असा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी लगावला. शरद पवारांच्या पार्टीत नेते का राहण्यास तयार नाही याचं आत्मचिंतन त्यांनी करावं. भाजपाची अवस्था आता पहिल्यासारखी राहिली नाही. लोकांना नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास असल्याने त्यांनी भाजपाला प्रचंड प्रमाणात यश दिलं आहे. त्यामुळे आता कोणावर दबाव टाकून लोकं आपल्या पक्षात घ्यावी अशी अवस्था भाजपाची नाही असेही त्यांनी सांगितले.