लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केला विश्वास
नवी दिल्ली : भारतीय तिन्ही सैन्य दलात समन्वय असणे आवश्यक असून त्यांच्या कृतीवर देशाची सुरक्षा अवलंबून असते. तसेच आमचे जवान आमची सर्वात मोठी ताकद आहे, भविष्यातील प्रत्येक आव्हानास सामोरे जाण्यास आम्ही सज्ज असल्याचे मत भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी सांगितले आहे.
#WATCH “As the army, we swear allegiance to the Constitution of India…Justice, liberty, equality and fraternity enshrined in the Constitution should guide us,” Army Chief General Manoj Mukund Naravane pic.twitter.com/KsFzbhfkS0
— ANI (@ANI) January 11, 2020
आम्ही सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहोत व भविष्यासाठी प्रशिक्षणावर देखील भर असणार आहे. सैन्य दलात देखील समन्वयावर का होत असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले. लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला आहे. ते देशाचे 28 वे लष्करप्रमुख ठरले आहेत.
जनरल बिपिन रावत यांची केंद्र सरकारकडून संरक्षण प्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स) निवड करण्यात आली आहे. रावत लष्करप्रमुख पदावरुन निवृत्त झाले आहेत. जनरल बिपिन रावत यांच्या जागी लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल नरवणे यांनी लष्करात 37 वर्ष सेवा बजावली असून, विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.