आम्ही हिंदुत्त्ववादीच आहोत, धर्मांतर केलेलं नाही. असा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला आहे. युती तुटली म्हणजे धर्मांतर केलं असं नाही. आम्ही कालही हिंदूच होतो आणि आजही हिंदूच आहोत. उद्याही हिंदूच राहणार असल्याचे ठाकरे यांनी नागपूरमध्ये झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात ठणवुन सांगितले.
मी शेतकऱ्याशी बांधील आहे. आताची जबाबदारी आमच्यावर मोठी आहे. आम्ही दिलेले वचन विसरलेलो नाही अशा शब्दात ठाकरेंनी विरोधकांचा समाचार घेतला. अच्छे दिन कुठे आहे म्हंटल्यावर विरोधकांची बोबडी वळते तसे आम्ही नाही. ठाकरे सरकार हे जनतेचं सरकार असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्ता आल्यावर मी बदललो नाही बदलणार नाही. बाळासाहेबांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे. साहेबांची शिकवण शिवसैनिकांनी कधीही विसरता काम नये असा कानमंत्र त्यांनी शिवसैनिकांना दिला .