सात राज्यांतील 59 जागांसाठी एकूण 979 उमेदवार निवडणूक रिंगणात
नवी दिल्ली – 2019 लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून जोरदार सुरवात झाली आहे. काँग्रेसचे महासचिव ‘प्रियंका गांधी’ वाड्रा यांनी सुद्धा दिल्लीतील सरदार पटेल विद्यालयातील लोदी इस्टेट मधील मतदान केंद्रात मतदान केले.
Congress General Secretary for UP (East), Priyanka Gandhi Vadra after casting her vote in Delhi: It’s a really important election because we are fighting to save democracy, for our country, and keeping that in mind I cast my vote.#Phase6 #LokSabhaElections2019 pic.twitter.com/Te7u4LYsFf
— ANI (@ANI) May 12, 2019
मतदान झाल्यानंतर प्रियांका गांधींनी पत्रकारांशी सवांद साधला आहे. ही निवडून खरोखरच अतिशय महत्त्वाचे निवडणूक आहे. कारण आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहोत. आणि हे लक्षात ठेवूनच मी देखील माझं मत दिलं आहे. असं काँग्रेसचे मसचिव प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या.सहाव्या टप्प्यामध्ये सात राज्यांतील 59 जागांसाठी एकूण 979 उमेदवार त्यांचे नशीब आजमावत आहेत. दिल्लीच्या चांदनी चौक, नवी दिल्ली, उत्तर-पूर्व दिल्ली, पूर्व दिल्ली, उत्तर पश्चिम दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली या भागांमध्ये आज मोठ्या प्रमाणात लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे.