नवी दिल्ली – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जय श्रीरामचे नारेबाजी झाल्याचे समोर आले आहे. कार्यक्रमात बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाषणासाठी व्यासपीठावर आल्या असताना जय श्रीराम अशी घोषणाबाजी करण्यात आली. या नारेबाजीमुळे व्यथित झालेल्या ममता यांनी भाषण देण्यास नाकार दिला. यावेळी व्यासपीठावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होती.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये हा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला होता. ऐन भाषणाच्या वेळी नारेबाजी सुरू केल्यामुळे ममता यांनी या कृतीचा विरोध केला. तसेच कार्यक्रमात एका विशिष्ट पक्षाचे लोक उपस्थित होते, असा आरोप त्यांनी केला. सरकारने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये प्रोटोकॉल पाळले जावेत, असा टोला त्यांनी मोदींसमोरच लगावला.
#WATCH | I think Govt’s program should have dignity. This is not a political program….It doesn’t suit you to insult someone after inviting them. As a protest, I won’t speak anything: WB CM Mamata Banerjee after ‘Jai Shree Ram’ slogans were raised when she was invited to speak pic.twitter.com/pBvVrlrrbb
— ANI (@ANI) January 23, 2021
या कार्यक्रमातील घटनेमुळे ममता व्यथित झाल्या आहेत. एखाद्या व्यक्तीला आमंत्रित करून त्यांना अपमानित करणे हे तुम्हाला शोभा देत नाही, अशी टीका करताना ममता यांनी बोलण्यास नकार दिला. तसेच याचा विरोध करण्यासाठी आपण काहीही बोलणार नसल्याचे म्हटले. विशेष म्हणजे ममता यांनी आपली नाराजी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर व्यक्त केली.