पुणे – खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातील पाणीसाठा स्थिर आहे. पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या 4 धरणांत मिळून 28.50 टीएमसी म्हणजे 97 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
शहराला खडकवासला प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्याचबरोबर 4 तालुक्यांतील शेतीलाही याच प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे खडकवासला धरणात किती पाणी उपलब्ध आहे.
यावर पाणीवाटपाचे गणित ठरते. यंदा चांगला पाऊस झाल्याने खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे 100 टक्के भरली आहेत.खडकवासला धरणात 1.69 टीएमसी, पानशेतमध्ये 10.65 टीएमसी, वरसगाव धरणात 12.82 टीएमसी आणि टेमघर धरणात 3.34 टीएमसी पाणीसाठा आहे. मागील याच दिवशी खडकवासला प्रकल्पात 27.74 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता.