Dainik Prabhat
Saturday, June 10, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #OdishaTrainAccident
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मुख्य बातम्या

चर्चा: जलस्रोत प्रदूषणाचे संकट

by प्रभात वृत्तसेवा
April 9, 2019 | 7:00 am
A A
चर्चा: जलस्रोत प्रदूषणाचे संकट

अशोक सुतार

केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत देशभरातील सर्वच राज्यात जलस्रोतांची तपासणी करण्यात आली. यात महाराष्ट्रातील 1 लाख 71 हजार 484 जलस्रोत दूषित आढळले आहेत. राज्यातील ही परिस्थिती अधोगतीकडे जाणारी आहे, असे वाटते. महाराष्ट्रात 53 नद्या प्रदूषित असल्याने त्यावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते व या परिस्थितीबद्दल खंत व्यक्त केली होती. त्यामुळे राज्य शासनाने समिती नेमली. विभागवार गटसमिती नेमून विविध अधिकारी व समाजसेवकांना, संस्थांना सोबत घेऊन कामाची विभागणी केली. परंतु या गदारोळात राज्य सरकारची पाच वर्षांची मुदत संपत
आली आहे.

2014 साली महाराष्ट्रातील प्रदूषित नद्यांची आकडेवारी 49 होती, ती आता वाढली आहे. उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरले. 152 ठिकाणी पाण्याचा दर्जा खालावलेला होता. यावर राज्य सरकार काय उपाययोजना करणार?, असा सवाल तेव्हा न्यायालयाने सरकारला विचारला होता. त्यानंतर सरकारने काहीच उपाययोजना केली नाही. प्रदूषित नद्यांच्या वाढत्या संख्येमुळे पर्यावरण सुरक्षित राखण्याची सरकारची इच्छाशक्‍ती आहे की नाही हे यावरून समजते. विद्यमान राज्य सरकारने तीन वर्षांपूर्वी नद्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाविषयीचे आधीचे धोरण रद्द केले. त्यानंतर सरकारने नवे सर्वकष धोरण राबविलेच नाही. राज्य सरकारच्या निष्क्रियपणामुळे हे घडले असल्याची टीका न्यायालयाने केली होती. परंतु नद्यांच्या व जलस्रोताच्या प्रदूषणात अजूनही भर पडत आहे.

राज्यांतील 53 प्रदूषित नदीपट्ट्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी तत्काळ कृती आराखडा तयार करण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने राज्याच्या पर्यावरण विभागाला नुकताच दिला आहे. कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी पाच सदस्यीय नदी पुनरुत्थान समितीही गठीत करण्यात आली आहे. नद्यांच्या प्रदूषणाची राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) गंभीरपणे दखल घेतली असून त्यामुळे राज्य सरकारला यावर काम करावे लागणार आहे. नद्यांचे पर्यावरण सुरक्षित राखणे आणि पाण्याचे स्रोत अबाधित राखणे हे सरकारचेच नव्हे तर आपलेही कर्तव्य आहे. .

राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिलेल्या आदेशानुसार, राज्याच्या पर्यावरण विभागाने नद्यांच्या प्रदूषणाबाबत नदी पुनरुत्थान समिती या गठीत करण्यात आलेल्या समितीला आपला अहवाल दोन महिन्यात राज्य सरकारकडे सादर करायचा आहे. राज्य सरकारने या समितीकडून आलेला अहवाल केंद्रीय प्रदूषण मंडळाकडे सादर करावयाचा आहे. नदी पुनरुत्थान समितीने शैक्षणिक संस्था, धार्मिक संस्था आणि आर्थिक आस्थापनांमधील व्यक्तींना सहभागी करून घेतले आहे. नद्यांच्या प्रदूषणाबाबत काय उपाययोजना करता येईल, हा निर्णय राष्ट्रीय हरित लवादाला घेता येणार असून त्यानुसार राज्य सरकारने कार्यवाही करण्याची अपेक्षा आहे.

नद्यांमध्ये केवळ सांडपाणीच नव्हे, तर रसायने, जैविक कचरा, औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांचे दूषित पाणी प्रक्रिया न करता सोडले जात आहे. नद्या प्रदूषित करणारे खरेतर राजकीय नेते, कंत्राटदार, कारखानदार, बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यामुळे नद्यांची अधोगती झाली. आपण नदीपात्रात बंगले, रिसॉर्ट, रस्ते बांधू लागलो आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थाही नद्यांमध्ये सांडपाणी, मैलापाणी सोडतात. घरगुती सांडपाणी एकाच ठिकाणी केंद्रित होत असल्याने राज्यातील जलस्रोत दूषित होण्याचा धोका वाढतो आहे. सुमारे 75 ते 80 टक्के जलस्रोत याच कारणामुळे दूषित झाले आहेत.

केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत देशभरातील सर्वच राज्यात जलस्रोतांची तपासणी करण्यात आली. यात महाराष्ट्रातील 1 लाख 71 हजार 484 जलस्रोत दूषित आढळले आहेत. महाराष्ट्रातील 5 लाख 92 हजार 743 जलस्रोतांपैकी 4 लाख 66 हजार 893 जलस्रोतांची तपासणी करण्यात आली. यात मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात ते दूषित आढळले. यातील 99 हजार 609 जलस्रोतांवर सर्वाधिक रासायनिक प्रभाव तर 71 हजार 875 जलस्रोतांवर जीवाणूजन्य प्रभाव दिसून आला. सांडपाण्याच्या विल्हेवाटीच्या केंद्रिकृत पद्धतीमुळे जलस्रोत दूषित होण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्याचे विकेंद्रीकरण केल्यास हा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटू शकतो.

पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ही जलनीतीची प्राथमिकता आहे. त्यानंतर पाणी उद्योगांसाठी दिले पाहिजे. मात्र, वस्तुस्थिती उलट आहे. उद्योग ही प्राथमिकता झाली आहे. दूषित पाण्याचे प्रमाण उद्योगांमुळे वाढत आहे हे खरे असले तरीही घरगुती सांडपाणीही त्याला तेवढेच जबाबदार आहे, असे जलअभ्यासकांचे म्हणणे आहे. प्रामुख्याने स्नानगृहातून जाणाऱ्या पाण्यात शाम्पू, साबण आदींमध्ये रासायनिक घटक असतात. जलस्रोत दूषित होण्यामागे जीवाणूपेक्षाही रासायनिक प्रभाव अधिक असल्याचे या तपासणीतून आढळून आले. देशभरातील एकूण 1 कोटी 45 लाख 40 हजार 900 जलस्रोतांपैकी 91 लाख 1 हजार 192 जलस्रोतांची तपासणी करण्यात आली. यातील 21 लाख 23 हजार 948 जलस्रोतांमध्ये रसायनांचे तर 11 लाख सात हजार 13 जलस्रोतांमध्ये जीवाणूंचे प्रमाण अधिक आढळून आले.

जलस्रोत दूषित होऊ नये म्हणून उद्योगांसाठी कायदे, नियम आहेत, पण घरगुती सांडपाण्यासाठी असा कुठलाही कायदा, नियम नाही. घराघरातूनच सांडपाणी प्रक्रिया करून बाहेर पडले, तर जलस्रोत दूषित होण्याचा प्रश्‍नच उद्‌भवणार नाही. घराघरातून निघणारे पाणी किमान 80 ते 90 टक्के शुद्ध निघेल आणि ते नदीत सोडल्यानंतर नदी दूषित होणार नाही, असे नियोजन व्हावे. महाराष्ट्रात एकूण जलस्रोतांपैकी 20 टक्के जलस्रोत प्रदूषित झाला आहे, ही खचितच योग्य परिस्थिती नाही. यावर राज्य सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

Tags: editorial page article

शिफारस केलेल्या बातम्या

अग्रलेख : चीनचे धोकादायक मनसुबे
Top News

अग्रलेख : चीनचे धोकादायक मनसुबे

2 months ago
विशेष : शिक्षामाफीचे गांभीर्य
Top News

विशेष : शिक्षामाफीचे गांभीर्य

2 months ago
दिल्ली वार्ता : जेडीएस पुढेच आव्हान
Top News

दिल्ली वार्ता : जेडीएस पुढेच आव्हान

2 months ago
अबाऊट टर्न : चिन्हबदल
Top News

अबाऊट टर्न : चिन्हबदल

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

नाशिकला मान्सून पूर्व पावसाचा तडाखा; उकाड्यापासून नागरिकांची सुटका

“सत्ताधाऱ्यांकडूनच देशात असंतोष पसरवण्याचे काम…’; शरद पवार यांची मोदी सरकारवर सडकून टीका

तुळजाभवानी देवीच्या दानपेटीत 354 हिरे; कोणत्या भक्तांनी दिले दान…

मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई.! जप्त केले तब्बल ‘इतके’ किलो अंमली पदार्थ; तीन जणांना ठोकल्या बेड्या

दुचाकीवरून धूम स्टाईल ने दीड तोळ्याची चैन पळवली

जामखेड शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडे उन्मळून पडली; वीज पुरवठा देखील झाला खंडित

#WTC23 Final #AUSvIND : ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 270 धावांवर घोषित, भारतासमोर विजयासाठी मोठं आव्हान

….म्हणून दोन कार्यकारी अध्यक्ष नेमले? शरद पवारांनी सांगितलं नेमकं कारण, वाचा…

Maharashtra Politics : श्रीकांत शिंदे खासदारकीचा राजीनामा द्यायलाही तयार, भाजप-शिवसेना युतीत तणाव!

‘महाराष्ट्रात लवकरच दाखल होणार मान्सून…’; हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

Web Stories

पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
आजचे भविष्य
आजचे भविष्य
सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून  सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही  ‘रिएक्शन’
सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही ‘रिएक्शन’
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास
अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास

Most Popular Today

Tags: editorial page article

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
where to buy viagra buy generic 100mg viagra online
buy amoxicillin online can you buy amoxicillin over the counter
buy ivermectin online buy ivermectin for humans
viagra before and after photos how long does viagra last
buy viagra online where can i buy viagra

Add New Playlist

error: Content is protected !!
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय आजचे भविष्य सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही ‘रिएक्शन’ देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास