येरवडा : मंगळवारी सकाळी येरवडा येथील स्व.यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन शाळेत पाण्याच्या टाकीचा वाॅल तुटला होता. त्यामुळे येथील परिसरात सगळीकडे पाणीच पाणी झाले होते.
तर सुभाषनगर आणि गणेश नगर भागात पाणी शिरले होते. या घटनेची माहिती दिल्यानंतर पाणी पुरवठा विभागाने वॉलच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु केले आहे.