मुुंबई – राज्यात अनेक भागात आत्तापासूनच पाणी टंचाई जाणवत असल्याने गाव आणि वाड्यांवर टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. कुठे शासकीय तर कुठे खासगी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरु असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यातील 70 गावं आणि 204 वाड्यांवर 75 टॅंकरद्वारे सध्या पाणीपुरवठा केला जात आहे.
ज्यात 7 शासकीय तर 68 खासगी टॅंकरचा समावेश आहे. ज्यात सर्वाधिक टॅंकर ठाणे आणि पालघर जिल्ह्याला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, राज्यात उन्हाचा चटका वाढत असून पाण्याची मागणी देखील वाढू लागली आहे. त्यातच पाण्याची पाणीपातळी घसरत आहे.