मुंबई – बिग बी अमिताभ बच्चन यांच्या “कौन बनेगा करोडपती?’चा 13 वा सिझन सध्या जोरात सुरू आहे. याशिवाय त्यांचा “चेहरे’देखील रिलीज झाला आहे. पण या आनंदाच्या गोष्टींव्यतिरिक्त त्यांना एका समस्येलाही सध्या तोंड द्यावे लागते आहे. त्यांच्या घरामध्ये सध्या पाण्याची टंचाई आहे.
पाण्याच्या टंचाईमुळे आपल्याला सध्या सकाळी 6 वाजताच उठावे लागते आहे. झोप पूर्ण न झाल्यामुळे पूर्ण दिवसभर आपल्याला थकल्यासारखे वाटते आहे, असे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे. त्यांनी एका ब्लॉगमधून आपली व्यथा मांडली आहे.
हा ब्लॉग प्रसिद्ध झाल्यावर आपल्या घरातील ही पाण्याची टंचाई बंद होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. पाण्याची ही समस्या दूर होण्यासाठी कदाचित आणखीन एक-दोन दिवस लागतील, असेही त्यांना वाटते आहे. आज सकाळी उठायला उशीरच झाला.
आज सकाळपासून खूपच थकल्यासारखे वाटते आहे. “केबीसी’च्या शूटिंगसाठी खूपच लवकर निघावे लागले. सकाळी 6 वाजता उठल्यावर कदाचित पाणी मिळू शकेल, असे वाटले होते, असेही बच्चन यांनी म्हटले आहे. अमिताभ बच्चन यांच्या घरीही पाणी टंचाई जाणवावी हे जरा आश्चर्य वाटावे असेच आहे.