इंदापूरात रोटरी क्लबतर्फे जलपरिषद संपन्न
इंदापूर – मानव पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. भूतलावर एवढे पाणी असताना देखील केवळ अयोग्य नियोजनामुळेच आपल्याकडे वेळोवेळी पाण्याची टंचाई भासते. मात्र सध्या आधुनिक तंत्रज्ञान व जलतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली जलव्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यामध्ये पाण्याचा योग्य पुनर्वापर केल्यास पाणी टंचाईवर मात करू शकतो, असे प्रतिपादन रोटरी क्लबचे वॉटर ऍन्ड सॅनिटाईज संचालक सतीश खाडे यांनी केले.
इंदापूर तालुक्यातील वाड्या, वस्त्यांवर पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. जलसंवर्धन करण्याच्या दृष्टीने काम करणे आवश्यक असून, इंदापूर पंचायत समितीच्या अल्पबचत सभागृहात शनिवारी (दि. 9) रोटरी क्लब ऑफ इंदापूर यांच्या वतीने जलतज्ज्ञ रो. सतीश खाडे यांचे रोटरी जलपरिषद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे संस्थापक उपाध्यक्ष मुकुंद शहा, रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय शहा, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, सचिव भीमाशंकर जाधव, को, चेअरपर्सन नंदकुमार गुजर, रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष सागर शिंदे, सायली जोशी, रवींद्र उल्लंघवाड, उमेश नाईक, व्यंकटेश घोडके, विनोद गांधी, प्रसन्न जोगदेव, मीना राव, मारुतराव सिनारे, विनोद कुलकर्णी, मंगेश बांग आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील मोहिते, संजय दोशी, पद्मसिंह जाधव, उपाध्यक्ष नरेंद्र गांधी, खजिनदार सुनील मोहिते, धरमचंद लोढा, राजाराम सागर, दत्तात्रय व्यवहारे, नितीन लोंढे, नितीन शहा, अमर गायकवाड, प्रमोद भंडारी, प्रशांत घुले, वरकुटे रोटरी क्लबचे अध्यक्ष शशिकांत शेंडे यांनी प्रयत्न केले.