नगर – कायनेटिक चौक परिसरातील विविध भागात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याबाबतचे सामाजिक कार्यकर्ते सोपान कारखिले यांनी मनपा उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे यांना निवेदन देऊन पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला. यावेळी रावजी नांगरे, शुभम बेद्रे आदींसह नागरिक उपस्थित होते.
मनपा आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कायनेटिक चौक परिसरातील प्रियंका कॉलनी, लक्ष्मीकृपा कॉलनी, सुखकर्ता कॉलनी, छायानगर, गुणे बंगला परिसर, रविश कॉलनी, सारस कॉलनी, आव्हाड वीटभट्टी, आंबेडकर उद्यान ते सानप मळा, नगर-दौंड रोड ते सुभद्रानगरपर्यंत, उदावंत मळा, पांजरापोळ या भागामध्ये पाण्याची समस्या फार बिकट आहे. गेली 10 ते 15 वर्षांपासून पाण्याची समस्या आहे.
कधी पाणी येते तर कधी पाणी येत नाही. जर पाणी सोडले तर नळाला पाणी येत नाही. तेथील जनता व माता-भगिनी पाण्यावाचून फार त्रस्त आहेत. पाण्याचा कोणताही टाइम नाही. पाणी सोडले तर कधी दुपारी सोडतात, नाही तर कधी संध्याकाळी सोडताता, पण पाणी सोडले तरी पाणी नळाला येत नाही, याचे कारण असे आहे की, पाण्याची कधीही लेव्हल राहत नाही, पाणी पूर्ण दाबाने येत नाही. या भागामध्ये फेज टू चे काम अर्धवट झालेले आहे ते काम लवकरात लवकर चालू करावे व आपण स्वत: यामध्ये लक्ष घालावे.
रेल्वे स्टेशनच्या जो पाण्याचा टाईम आहे, त्याच भागाचा वॉल चालू पाहिजे, पण औरंगाबाद हायवे ते कोठी ते महानगरपालिका ते मुकुंदनगर या भागामधील वालमन तेथील वॉल चालू ठेवतात, याची आपण चौकशी करावी व त्याच्यावर लक्ष ठेवावे. यासर्व बाबींचा विचार करुन जनतेला पाणी व्यवस्थीत देण्यात यावे, जर असे नाही झाले तर मी स्वत: या आपल्या महानगरपालिकेसमोर आत्मदहन करणार आहे, याची सर्व जबाबदारी महानगरपालिकेची राहील व पूर्ण प्रशासनाची राहील.
आपण स्वत: येऊन व पाणी पुरवठा अधिकारी कर्मचारी व वॉलमन यांनी प्रत्येकाच्या घरी येऊन चौकशी करावी कि आपल्याला पाणी येत की नाही. याची खात्री करावी. नाही तर काय आपला महानगरपालिकेमध्ये आंधळं दळतंय व कुत्र पिठ खातंय असे जनतेने समजावे का?