मुंबई – ‘अभिवादन करताना पादत्राणे बाजूला काढून ठेवणे ही भारताची संस्कृती आहे. महाराष्ट्राची तर आहेच आहे. सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते’ असं ट्विट करत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. त्यांनी ट्विटवर व्हिडिओ शेअर केला आहे.
अभिवादन करताना पादत्राणे बाजूला काढून ठेवणे ही भारताची संस्कृती आहे. महाराष्ट्राची तर आहेच आहे. सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते pic.twitter.com/7Ujwgtuv4x
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 26, 2022
दरम्यान, सोशलवर मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल या व्हिडिओमध्ये २६/११ मधील शहिदांना चप्पल घालून अभिवादन केलं आहे. राज्यपालांच्या या कृतीने पुन्हा एकदा वादंग निर्माण होणार आहे.