वाघोली (प्रतिनिधी) : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या वाघोली गावची लोकसंख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून वाढत्या लोकसंख्येला विचारात घेऊन वाघोली चा भौगोलिक विस्तार विचारात घेऊन वाघोली मध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील यांनी केली आहे.
याबाबत राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील यांनी सांगितले की, वाघोली गावांमधील कचरा वाघोली गावातच त्याची योग्य पद्धतीने कचरा प्रक्रिया प्रकल्प द्वारे विल्हेवाट लावावी. यासाठी भौगोलिक विस्तार विचारात घेऊन त्या त्या भागात कचरा प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी करण्यात यावी.
वाघोली सोडून इतर भागातील कचरा पुणे महानगरपालिकेने वाघोलीतील गायरान जागेत आणून टाकला तर त्याला तीव्र विरोध करण्यात येईल. अनेक वर्षापासून ची वाघोलीतील कचरा समस्या सोडवण्यासाठी सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे,आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरू असल्याचे राजेंद्र पाटील यांनी सांगितले.
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट २३ गावातील कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचे नियोजन करण्यात येत असून यावर तोडगा काढण्यासाठी कचरा व्यवस्थापनाशी संबंधित कंपन्या अथवा ठेकेदारांनी पर्याय सुचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पालिकेच्या जुन्या हद्दीतील कचरा व्यवस्थापन अद्याप पूर्ण क्षमतेने होत नाही. महापालिकेचा एखाद-दुसरा प्रकल्प वगळता अन्य प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत त्याच आता नव्याने समावेश झालेल्या गावांमधील २०० टन कचऱ्याची भर पडली आहे. महापालिकेने २३ गावातील कचरा व्यवस्थापन करण्यासाठी पर्याय जाणून घेण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविले आहेत, यामध्ये कचरा थेट सिमेंट फॅक्टरी मध्ये वाहून नेणे, ओला कचरा शेतीसाठी पुरवणे, प्रक्रिया करणे आदी उपाय सुचवणे याविषयी आवाहन करण्यात आल्याचे कचरा घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले आहे.