मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बहुचर्चित मुंबईतील सभा सुरू झाली आहे. सभेपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजवर जोरदार हल्ला चढवला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस १ मेच्या मुंबईतील सभेत म्हणाले की, मुंबईला स्वातंत्र करायचं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना चोख प्रत्युत्तर दिलं. उद्धव म्हणाले की, मुंबई यांना महाराष्ट्रापासून तोडायची आहे. आता फक्त त्यांच्या मनातलं ओठावर आलय.
देश स्वातंत्र झाला त्यावेळी भाजप नव्हतं. पण तुमची मातृसंस्था आरएसएस होतं. देशाच्या स्वतंत्र्य लढ्यात आरएसएस होतं का, असेल तर पुरावा द्या, अस आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं.
उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेनवरून भाजपवर हल्ला चढवला. बुलेट ट्रेन झाल्यानंतर मराठी माणूस कशाला गुजरातला जाणार असा सवाल करत मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.