भवानीनगर – श्री संत तुकाराम महाराज पालखीने बारामतीचा मुक्काम आवरून सकाळी काटेवाडीकडे प्रस्थान ठेवले. काटेवाडी गावच्या शिवेवर शरयु फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार, पार्थ पवार यांनी पालखीचे स्वागत केले. पार्थ पवार यांनी पालखीचे सारथ्य केले.
काटेवाडी गावातील कमानीपासून पालखी खांद्यावर घेऊन परंपरेप्रमाणे धोतराच्या पायघड्या घालत पालखी ओटा याठिकाणी आणण्यात आली. परंपरेप्रमाणे परीट समाजाच्या वतीने धोतराच्या पायघड्या घालत पालखी विसावा ठिकाणी आणण्यात आली. पालखी रथातून पालखी पार्थ पवार व इतरांनी पालखी खांद्यावर घेतली. पालखी ओटा याठिकाणी आल्यावर विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. हजारोंच्या संख्येने हा सोहळा “याचि देही, याचि डोळा’ पाहिला. यावेळी प्रांताधिकारी हेमंत निकम, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, सरपंच विद्याधर काटे, एकनाथ काटे, अनिल काटे, महादेव कचरे, संजय काटे, के. टी. जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.