फलटण – संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी फलटण या ऐतिहासिक नगरीत विसावा घेण्यास थांबली होती. दरम्यान, आज सकाळी साडेचार वाजता माऊलींच्या पादुकांना जलभिषेक करण्यात आला. त्यानंतर शितोळे सरकार यांचे नैवैद्य दाखवून माऊलींची आरती झाली. आणि माऊलींच्या पालखीचे बरडगाव कडे प्रस्थान झाले.