नवी दिल्ली – . भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत आपण मोठा प्रवास करत आलोय, मात्र हा प्रवास असाच सुरु ठेवण्यासाठी काही गोष्टी बदलण्याची आणि काही स्वीकारण्याची गरज असल्याचं मत रामदेव बाबांनी आज एका आयोजित कार्यक्रमात बोलताना संगितले.
आपल्याला भारत हा जातीपात, प्रांत, भाषा आणि धर्मावरुन भेदभाव करणाऱ्या गोष्टींपासून मुक्त झालेला पहायचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
एखादे राष्ट्र प्रगती करत असते तेव्हा, शेती, उद्योग, आरोग्य, संशोधन आणि सामाजिक जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये एखाद्या विशिष्ट तत्वाचा सहभाग असतो असं नाही तर सर्व तत्वांचा समावेश असतो. त्यामुळे सर्वांगीण विकास होण्यास मदत होते, असे ते म्हणाले.
आपल्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक आयुष्यामध्ये आपले जे मूळ सिद्धांत आहेत ते देशातील धर्मनिरपेक्षता, समानता, सहिष्णूता, सद्भावना आणि एकात्मतेवर आधारित असून आपण हे सर्व पुढे घेऊन गेलं पाहिजे. भविष्यात एक देश म्हणून आपल्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत.
खरं तर या विकासाच्या प्रवासाचा अंतर नसतो, असं मत रामदेव यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना म्हणाले की ब्रिटिश राजवटी बद्दल मला अद्याप राग आहे, मी लहानपणापासूनच काही गोष्टींबद्दल खूप आग्रही होतो.
इंग्रजांनी आपल्या देशाची फार लूट केली. त्यामुळे मला आजही त्यांच्याबद्दल राग वाटतो. इंग्रजांनी आपल्यावर आक्रमणं केल्याचं इतिहास सांगतो. मात्र आपण राजकीय गुलामगिरीमधून मुक्त झालो आहोत.