जनतेला पंतप्रधानांचे आवाहन
नवी दिल्ली : देशातील कोरोनाला रोखाण्यासाठी सरकारकडून सर्वच पातळीवर उपाय योजना आखल्या जात आहेत. मात्र सार्वजनिक ठिकाणी असणारी गर्दी काही केल्या कमी होताना दिसत नाही. त्यात कोरोनाच्या भीतीने महानगरांमधून आपल्या गावी जाणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांतील रेल्वे स्टेशन्सवर प्रचंड गर्दी उसळली आहे. अशा जनतेला संबोधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन टि्वट केले आहेत. जिथे आहात तिथेच थांबा, प्रवास करून जीव धोक्यात घालू नका, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
कोरोना के भय से मेरे बहुत से भाई-बहन जहां रोजी-रोटी कमाते हैं, उन शहरों को छोड़कर अपने गांवों की ओर लौट रहे हैं। भीड़भाड़ में यात्रा करने से इसके फैलने का खतरा बढ़ता है। आप जहां जा रहे हैं, वहां भी यह लोगों के लिए खतरा बनेगा। आपके गांव और परिवार की मुश्किलें भी बढ़ाएगा।
— Narendra Modi (@narendramodi) March 21, 2020
पंतप्रधानांनी ट्वीट करताना, “करोना व्हायरसची लागण होईल या भीतीने अनेक लोक सध्या जिथं पोटापाण्यासाठी नोकरी करण्यासाठी गेले आहेत, तिथून गावी परतू लागले आहेत. गर्दीत प्रवास केल्याने करोनाची लागण होण्याची शक्यता वाढते आहे. तुम्ही जिथे जात आहात तिथल्या लोकांसाठीही धोका वाढणार आहे. त्यामुळे तुमचं गाव आणि कुटुंबाच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.”असे म्हटले आहे.
मेरी सबसे प्रार्थना है कि आप जिस शहर में हैं, कृपया कुछ दिन वहीं रहिए। इससे हम सब इस बीमारी को फैलने से रोक सकते हैं। रेलवे स्टेशनों, बस अड्डों पर भीड़ लगाकर हम अपनी सेहत के साथ खिलवाड़ कर रहे हैं। कृपया अपनी और अपने परिवार की चिंता करिए, आवश्यक न हो तो अपने घर से बाहर न निकलिए।
— Narendra Modi (@narendramodi) March 21, 2020
दुसऱ्या टि्वटमध्ये मोदी यांनी म्हटलंय की, “तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की, कृपया तुम्ही ज्या शहरात आहात तिथेच राहा. त्यातूनच आपण करोना व्हायरसचा फैलाव होण्यापासून रोखू शकतो. रेल्वे स्टेशन्स, बस स्थानकांवर गर्दी करून आपण आपल्या आरोग्याशीच खेळत आहोत. कृपया स्वतःची आणि आपल्या परिवारच्या चिंता करा. आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर पडू नका.”
मोदी यांनी गुरुवारी सायंकाळी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. अनेक शहरांमधील दुकाने बंद आहेत. रस्त्यांवर लोकांची गर्दीही कमी झाली आहे.